महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर काही काळ खंड पडला होता. आता राज्यात पावसाची नवी सर आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ जुलै रोजी महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, रायगड आणि पुण्याती घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बेस्ट बसचा अपघात झाल्यानंतर रुग्णवाहिकांचा प्रश्न अधोरेखित झाला. जखमींनी त्याही अवस्थेत सार्वजनिक, खासगी रुग्णवाहिकांची सेवा देणाऱ्या संस्थांना संपर्क केला, मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. १०८ क्रमांकावरही सातत्याने संपर्क साधून उत्तर मिळाले नाही. अखेर पोलिसांच्या गाडीतून मृतदेह आणि जखमी यांना एकत्र रुग्णालयामध्ये नेण्यात आले.